⋇  जुनागढ संस्थानाचे विलीनीकरण (२० फेब्रुवारी १९४८)
−  गुजरात सौराष्ट्रातील जुनागढ संस्थानातील प्रजेची भारतात सामील होण्याची ईच्छा होती.
−  परंतु जुनागढच्या नबाबाने पाकिस्तानशी गुप्तपणे संधान बांधून पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
−  संस्थानी प्रजेने याविरुद्ध आंदोलन करताच नबाब पाकिस्तानात पळून गेला.
−  २० फेब्रुवारी १९४८ रोजी जनमताच्या कौलानुसार भारत सरकारने जुनागढ संस्थान भारतात विलीन केले.
⋇  हैद्राबादचे विलीनीकरण : −  १७ व १८ सप्टेंबर १९४८
−  'रझाकार' या हिंसावादी संघटनेचा नेता कासीम रझवी याने हैद्राबादच्या निजामाला भारतात सामील न होण्याचा सल्ला दिला.
−  पर्यायाने, निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारुन हैद्राबाद हे स्वतंत्र राज्य घोषित करतानाच मध्यप्रांत व व वऱ्हाड यांतील काही प्रदेश आपल्या राज्यास जोडण्याची मागणी केली.
−  जनमताच्या कौलासही न जुमानता त्याने पाकिस्तानला २० कोटीचे कर्ज दिले. तसेच भारतीय चलन हैद्राबादमधून रद्दबातल केले व पाकिस्तानशी संधान बांधले.
−  अखेर १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादेत 'ऑपरेशन पोलो' या न यशस्वी पोलीस कारवाई करण्यात आली.
−  १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादेत 'ऑपरेशन पोलो' या न यश पोलीस कारवाई करण्यात आली.
−  १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्कारली , हंद्रात भारतात विलीन करण्यात आले.
−  १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार, हैद्राबादमधील तेलगु भाषि प्रदेश आंध्र प्रदेशास, कन्नड भाषीक प्रदेश कर्नाटकास आणि मराठी भाषिकांचा मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रास जोडण्यात आला.
⋇  जम्मू − काश्मीरचे विलीनीकरण : −  (२६ व २७ ऑक्टोबर १९४७)
−  काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला.
−  १९४६ साली शेख अब्दुला यांनी महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात 'छोडो काश्मीर' चळवळ सुरू केली. यामध्ये पत्रकार बलराज पुरी आघाडीवर होते.
−  पाकिस्तानने राजा हरिसिंगवर विलीनीकरणासाठी दबाव आणून अनेक घुसखोर काश्मीरात सोडले.
−  २२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पाकिस्तानी सैन्याने टोळ्याच्या रुपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ केला.
−  या बदलत्या परिस्थितीत हरिसिंगाने भारत सरकारकडे मदत मागितली व २६ ऑक्टोबर १९४७ रोजी विलीनीकरणनाम्यावर सह्या केल्या.
−  २७ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतीय सेनेने प्रतिआक्रमण करून घुसखोरांना हटविले.मेजर जनरल कुलवंतसिंग, मेजर जनरल थिमय्या. मेजर जनरल आत्मसिंग, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवून निम्म्याहून आधिक काश्मिर मुक्त केले.
−  १९४८ मध्ये पंडित नेहरुंनी काश्मीरचा प्रश्न युनोकडे नेला व १ जानेवारी १९४९ रोजी युद्धबंदी घोषीत करण्यात आली.
−  पाकने घुसखोरी केलेला काश्मीरचा उर्वरित भाग ‘पाकव्याप्त काश्मीर' (POK) म्हणून ओळखला जातो.
−  फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींचे विलीनीकरण : −  भारतात फ्रेंचांची सत्ता चांद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे येनम येथे होती.
−  १९४९ − ५० मध्ये चांद्रनगर या वसाहतीत सार्वमत घेण्यात आले. इतरही वसाहती अशाच प्रकारे भारतात सामील झाल्या.
⋇  गोवामुक्ती संग्राम :
−  १९२८ मध्ये डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली.
−  १९४५ मध्ये डॉ. कुन्हा यांनी ‘गोवा युथ लीग' ही संस्था मुंबईत स्थापन केली.
−  १९४६ मध्ये डॉ. कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकुम मोडल्याबद्दल त्यांना आठ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
−  जून १९४६ मध्ये डॉ. राममनोहर लोहीयाना गोव्यातून हद्दपार करण्यात आले −  १९४८ मोहन रानडे (मुळ नाव : मनोहर आपटे) यांनी गोव्यातील पोर्तुगिजांविरुद्ध बंधनातून मुक्त केला (चळवळीचे नेतेः फ्रान्सिस मस्कारहेनस. वामन सरदेसाई)
−  २८ जुलै १९५४ आझाद गोमंतक दल व गोवन्स पीपल्स (नेते जॉर्ज वाझ, केशव तळवलीकर) यांनी स्थानिक वारली नागरिकांच्या साह्याने नगहवेलीवर हल्ला चढवीला व नगर हवेली स्वतंत्र केली.
−  २ ऑगस्ट १९५४ विश्वनाथ लवांदे, राजाभाऊ वाकण कर, सुधीर फडके, काजरेकर, ना.ग. गोरे, सेनापती बापट, पीटर अलवारीस, सौ. सुधाताई जोशी इ. गोव्यात सत्याग्रह केला.
−  १९५५ मधील गोवामुक्ती सत्याग्रहात अनेकांनी हुतात्म्य पत्कारले. यामध्ये हिरवे गुरूजी, कर्णाल सिंध, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा समावेश होता.
− डिसें. १९६१ मध्ये भारत सरकारने नाईलाजाने गोव्यात लष्कर घुसविले.
−  १९ डिसेंबर १९६१ गोवा पोर्तुगीजांच्या जोकडातून पुर्णपणे मुक्त झाला व त्याचे भारतात विलीनीकरण करण्यात येवून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आले.
−  १९ डिसेंबर २०११ रोजी गोवा मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
−  २० डिसेंबर १९६३ रोजी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात लोकनियुक्त सरकार स्थापन झाले.
−  गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे होते.




⚫  ⚫  ⚫

टिप्पण्या