आधुनिक भारताचा इतिहास
⋇ प्रबोधन युग :− युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे 'आधुनिक युगाचा' पाया घातला गेला. या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात.
⋇ प्रबोधनाची चळवळ / पुनरूज्जीवनाची चळवळ :
− इ.स. १४ व्या शतकातील काळ हा युरोपातील अराजकतेचा कालखंड म्हणून गणला जातो. किंवा या काळाला युरोपातील तमोोवर धर्माचा जबरदस्त पगडा होता.
− पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस मात्र युरोपात समाजमनः स्थितीत अमुलाग्र बदल झाला.
− प्रबोधन ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती.
− तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, संगीत, शिल्प, चित्रकला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रबोधन चळवळीचा अविष्कार झाला. याच काळात १४५० च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. त्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत नेणे शक्य झाले.
⋇ युरोपियन व्यापाराचे भारतात आगमन :
− इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत युरोपीय लोक पूर्वेकडील देशांमधून आयात केलेले मसाल्याचे पदार्थ साखर,कापड,रेशीम, मौल्यवान वस्तू वापरत असत.
− पण इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी 'कॉन्स्टॅन्टिनोपल' (इस्तंबूल) जिंकून घेतले. हे शहर म्हणजे बायसन्टाईन साम्राज्याची (पुर्वेकडील रोमन साम्राज्याची) राजधानी होती.
− तुकांनी भारत-युरोप यामधील ‘इराणचे आखात-कॉन्स्टॅन्टिनोपल-इटली' हा खुष्कीचा मार्ग म्हणजेच भूमार्ग रोखून धरला.
− भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गाचा शोध लावणे युरोपियांना आवश्यक झाले.
− बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला. या टोकाला ‘आशेचे भुशिर' (Cape of Good Hope) हे नाव मिळाले.
− भारताच्या शोधात निघालेल्या कोलंबस ने अटलांटिक महासागर पार करून १४९२ मध्ये एका किनाऱ्याजवळ पोहोचला. आपण भारतात उतरलो आहोत असा कोलंबसचा गैरसमज झाला. पुढे इटालियन खलाशी अमेरिगो व्हेस्पूसी हा कोलंबसच्या मार्गानेच त्या किनाऱ्यावर पोहोचला. हा भारताचा किनारा नाही हे त्याच्यामुळे लक्षात आले आणि या अज्ञात प्रदेशाला अमेरिगोच्या नावावरून 'अमेरिका खंड' हे नाव प्राप्त झाले. म्हणजेच कोलंबसने 'अमेरिका खंडाचा शोध लावला.
− 'वास्को-द-गामा' या पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरावर प्रवेश केला आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा तो पहिला युरोपियन ठरला व भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधला.
− कालिकतच्या 'झामोरिन’ राजाने वास्को-द-गामाचे स्वागत केले.
− १५०५ ला फ्रान्सिस्को-द-अल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून भारतात आला.
− १५०९ मध्ये अल्फान्सो-द-अल्बुकर्क हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर बनला. पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तारावर भर देतांना १५१० मध्ये बिजापुर च्या युसूफ आदिलशहाकडून गोवा हा प्रदेश जिंकून घेतला.
− अल्फान्सो-द-अल्बुकर्क हा पोर्तुगीज राज्याचा संस्थापक मानला जातो.
− पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार 'कोचीन' येथे स्थापन केली.
− पोर्तुगीजानंतर भारतात डंच, इंग्रज १९५२, फ्रेंच या युरोपियांनी भारतात प्रवेश केला. (पोर्तुगीज-डंच-इंग्रज-फ्रेंच)
− फर्मिनांड मॅगेलन याने पहिली पृथ्वीप्रदक्षिणा १५१९ मध्ये केली.
− १५९६ मध्ये 'कारनेलिस डॅहस्तमान' हा भारतात येणारा पहिला डंच नागरिक होता.
⋇ ब्रिटीशांचे भारतातील आगमन व सत्तेचा विकास:-
− लंडन मधील एका व्यापाऱ्याच्या गटाने ३१ डिसेंबर १६०० रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
− प्रारंभी राणी एलिझाबेथ ने १५ वर्षासाठी या कंपनीस पुर्वेकडील देशासोबत म्हणजेच 'केप ऑफ गुड होप' व मॅगेलिनची सामुद्रधुनी या भागातील सर्व देशासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली.
− राजा जेम्स पहिला याने १६०९ मध्ये कंपनीला कायमस्वरूपी परवानगी दिली.
− थॉमस स्मिथ हा कंपनीचा पहिला गव्हर्नर होता.
− १६१५ मध्ये इंग्रज वकिल ‘सर थॉमस रो' याने जहांगिर बादशहाकडु प्रथम व्यापारी सवलती मिळवल्या.
− १६०८ मध्ये इंग्रजांनी सुरत या ठिकाणी आपली पहिली वखार स्थापन केली.
− १६०२ मध्ये डच (हॉलंड) व्यापारांनी 'युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी ची' स्थापना केली.
− १६६४ मध्ये फ्रेंचांनी फ्रेंच ईस्ट इंडिया' कंपनीची स्थापना केली.
इंग्रज-फ्रेंच संघर्ष/तीन कर्नाटक युध्द - १७४६-१७६३ :
⋇ पहिले कर्नाटक युध्द : १७४६-१७४८
− पहिले कर्नाटक युध्द म्हणजे इंग्लड-फ्रान्स यांच्यात युरोपात चालु असलेल्या 'ऑस्ट्रेयन वारसा' युध्दाचा प्रतिक्रिया होती.
− कॉरोमोडेल किनारा व त्याच्या लगतच्या अंतर्भागास कर्नाटक असे नाव होते. या प्रदेशातच इंग्रज व फ्रेंच या परकीय सत्तांचा संघर्ष चालू होता.
− अशातच बारनेट च्या नेतृत्वात इंग्रजांनी फ्रेंचाची जहाजे पकडली.
− पुर्व किनाऱ्यावरील मद्रास (चेन्नई) हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र होते.
− पाँडेचेरी या ठिकाणी फ्रेंचाचे केंद्र होते.
− फ्रेंच गव्हर्नर डूप्लेने इंग्रजांच्या मद्रासवर आक्रमण करून जिंकून घेतले.
− १७४८ मध्ये एक्स-ला-शापेल चा तह होऊन युरोपात हे युध्द थांबले. या तहानुसारच भारतात कर्नाटक युध्द समाप्त झाले आणि फ्रेंचाना मद्रास इंग्रजांना परत द्यावे लागले.
− पहिल्या कर्नाटक युध्दात फ्रेंचानी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा