⋇ दुसरे कर्नाटक युध्द १७४८-१७५४:
−  पहिल्या कर्नाटक युध्दापासून डूप्लेची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली होती.
−  हैद्राबादचा निजाम उल-मुल्क आसफजाह याचा मृत्यू मे १७४८ मध्ये झाला व त्याच्या वारसामध्ये सुरू झाले?
−  कर्नाटक (अकार्ट) च्या गादीसाठी अन्न्वरूद्दीन व चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला. तर मृत्यूनंतरहैद्राबादच्या गादीसाठी नासिरजंग व मुजफ्फरजंग यांच्यात आव्हान निर्माण झाले.
−  राजकीय परिस्थितीचा फायदा घेत फ्रेंचानी डुप्ले व बुसी या अधिकाऱ्यांमार्फत मुझफ्फरजंगला हैद्राबादच्या गादीवर तर चंदासाहेबास कर्नाटकच्या गादीवर बसविण्याचे ठरविले.
−  इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नासिरजंग व अन्वरुधीचा यांचा पक्ष उचलून धरला.
−  मुजफ्फरजंग, चंदासाहेब व फ्रेंचानी ऑगस्ट १७४९ मध्ये वेल्लोरजवळ 'अंम्बूर' या ठिकाणी अन्वरूद्दीनचा पराभव केला व त्याला ठार मारले. मात्र या लढाईतून अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मदअली हा पळून जाऊन त्रिचनापल्लीचा किल्ल्याला आश्रयार्थ थांबला आणि मुजफ्फरजंग हैद्राबादचा तर चंदासाहेब कर्नाटकच्या गादीवर बसला.
−  अन्न्वरूद्दीनचा मुलगा त्रिचनापल्लीला आहे हे कळताच चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा दिला. याचाच फायदा इंग्रजांनी घेतला.
−  इंग्रजांनी रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटकवर हल्ला करून कर्नाटक जिंकून घेतले व जून १७५२ मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच सैन्याने इंग्रजासमोर शरणागती पत्कारली व डूप्लेचा पराभव झाला.
−  फ्रेंच सरकारने डुप्लेला पराभवाचे जबाबदार धरून त्याला आपल्या मायदेशी परत बोलावून घेतले व त्याच्या जागेवर फ्रेंच गव्हर्नर गॉडेह भारतात आहे.
−  गॉडेहू याने इंग्रजांशी पाँडेचेरी तह केला (१७५४-५५) व दुसरे कर्नाटक युध्द समाप्त झाले आणि इंग्रजांनी वर्चस्व प्रस्थापित केले.
⋇ तिसरे कर्नाटक युध्द :- १७५६-१७६३/ २२ जानेवारी १७६० ची वॉदिवॉशची लढाई:
−  १७५६ मध्ये युरोपात इंग्लड-फ्रान्स यांच्यात सप्त वार्षिक युध्द चालू होते. या सप्त वार्षिक युध्दाचे पडसाद भारतात उमटले.
−  फ्रेंच सरकारने कौंट-डी-लॅली यांच्या नेतृत्वाखाली भारतात मोठी सुसज्ज फौज पाठवली.
−  कौंट-डी-लॅलीने भारतात आल्याआल्याच एप्रिल १७५८ मध्ये इंग्रजांचा मद्रास येथील सेंट डेव्हीड किल्ल्यावर हल्ला चढवून जिंकून घेतला.
−  लॅलीने यावेळी एक चुक केली ती म्हणजे त्याने हैद्राबादला असलेला फ्रेंच गव्हर्नर बुसी यास मदतीस बोलावून घेतले.
−  फ्रेंच गव्हर्नर हैद्राबादेत नसल्याचा फायदा घेत इंग्रजांनी कर्नाटकचा प्रदेश जिंकुन घेतला. हैद्राबादचा निजामही इंग्रजांचा वर्चस्वाखाली आला.
−  २२ जानेवारी १७६० : वॉदिवॉशची लढाई
−  १७६३ च्या पॅरिसच्या तहानुसार 'सप्त वार्षिक' युध्द थांबले. या तहानुसारच भारतातील संघर्षही समाप्त झाला व इंग्रजांनी फ्रेंचांना पाँडेचरी परत केली.

इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व:


−  बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान यांच्या मृत्यूनंतर आलेला त्याचा पुत्र सिराजउद्दौलाच्या कारकिर्दीत इंग्रजांनी बंगालमध्ये इंग्रजी सतेचा पाया रवला.
−  सिराजउद्दीला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्याच वखारीभोवती तटबंदी बांधण्यास सुरूवात केली.
−  सिराजउद्दौलाने आपल्या फौजसह इंग्रजावर स्वारी करून 'कासिम बाजार' व 'कोलकाता' येथील वखारी ताब्यात घेतल्या.
−  कोलकाता येथील वखारीतुन सिराजउद्दौलाने १४६ इंग्रज पकडले व त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवले. त्यापैकी १२३ इंग्रज एकाच रात्री मृत्यूमुखी पडले. ही घटना भारतीय इतिहासात अंधार कोठडीची दुर्घटना (१७५६) (ब्लॅक होल ट्रेजेडी) म्हणून प्रसिध्द आहे.
−  या घटनेने इंग्रज भयंकर संतापले. इंग्रजांनी रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वात सिराजउद्दौलावर आक्रमण करून आपल्या वखारी ताब्यात घेतल्या.
−  रॉबर्ट क्लाईव्ह व सिराजउद्दौला यांच्या ९ फेब्रुवारी १७५७ ला अलीनगरचा तह झाला.
−  या तहानुसार इंग्रजांना कलकत्याभोवती तटबंदी ठेवण्याचा व बंगाल, बिहार, ओरिसा या प्रदेशात करमुक्त आयात करण्याचा अधिकार दस्तक मिळाला.
−  रॉबर्ट क्लाईव्ह एवढ्या विजयावर समाधानी नव्हता. त्याने नवाबाच्या दरबारात फंदफितूरी करून नवाबाचा सेनापती मीरजाफर, नवाबाचा दिवाण रायदुर्लभ आणि बंगालचे सेठ जगतसेठ व उमिचंद हे सगळे व्यापारी फितूर झाले आणि याच्यातूनच 'प्लासीची लढाई' उद्भवली.

प्लासीची लढाई : २३ जून १७५७


−  रॉबर्ट क्लाईव्ह सारखा अत्यंत धाडसी, मुत्सद्दी व महत्वाकांक्षी नेता यावेळी ब्रिटिशांना लाभला होता.
−  रॉबर्ट क्लाईव्ह हा ब्रिटिशांचा सेनापती आपले सैन्य घेवून सिराजउद्दौलावर चालून गेला.
−  मुर्शिदाबाद या आपल्या राजधानीतून सिराजउद्दौला आपल्या प्रचंड सैन्यासह लढाईस निघाला. परंतु हे सगळे सैन्य आतून फंदफितूरीने पोखरलेले होते.
−  प्लासी या गावाजवळ उभय सैन्यांची गाठ पडली परंतु नवाबाचा सेनापती मीर जाफर हा तटस्थ राहिल्यामुळे सिराजउद्दौलाचा पराभव झाला.
−  कुटनीती पहाता रॉबर्ट क्लाईव्ह दक्ष होता त्याने मीर जाफरच्या महत्वाकांक्षांना उत्तेजित केले व जवळजवळ न लढताच लढाई जिंकली.
−  रॉबर्ट क्लाईव्हने मीर जाफरला पुढे करून मुर्शिदाबाद घेतले आणि त्यास बंगालचा नवाब पदी बसविले.
−  प्लासीची लढाई ही भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. लष्करीदृष्ट्या तिला फारसे महत्व नसले तरी राजकीयदृष्ट्या ती अतिशय प्रभावी घटना ठरली आहे.
−  या लढाईतील विजयाने ब्रिटिशांच्या भावी साम्राज्याचा पाया घातला गेला.
−  भारतातील अतिशय बलाढ्य व संपन्न बंगालचा प्रदेश इंग्रजांचा प्रभावाखाली गेला.
−  प्लासीच्या लढाईतील विजयाने कंपनीला प्रचंड संपत्ती मिळाली होती व कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या स्वरूपात बक्षीस म्हणून रक्कमा देण्यात आल्या.
−  प्लासीच्या विजयाने ब्रिटिश ही भारतातील एक प्रमुख राजकीय सत्ता म्हणून उदयास आली. बंगालच्या रूपाने इंग्रजांना कामधेनूच मिळाली होती.
−  दिवसेंदिवस इंग्रजांच्या अपेक्षा वाढत गेल्या. मीरजाफर इंग्रजांच्या अपेक्षा पुरवू शकत नव्हता. कारण बंगालची आर्थिक सत्ता दुबळी झाली होती.
−  मीर जाफर इंग्रजांच्या अपेक्षा पुर्ण करू न शकल्याने इंग्रजांनी मीरजाफरचा जावाई मिर कासिम यास ऑक्टोबर १७६० मध्ये बंगालच्या नवाब पदी बसवले.
−  नव्या नवाबाने कंपनीस बरद्वान, मिदनापूर, चितगाव हे जिल्हा लष्कराच्या खर्चासाठी बहाल केले.
−  मिर कासिम हा मोठा हुशार व कार्यक्षम व्यक्ती होता. त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादहून ‘मोंगिर' येथे नेली व बंगालची तिजोरी भरून काढून अत्याधुनिक फौज उभारण्यास सुरूवात केली.
−  नव्या नवाबाकडून इंग्रजांना अशा अपेक्षा नव्हत्या.
−  इंग्रजांनी पुन्हा मिरकासिम ला नवाब पदावरून दूर करून १७६३ मध्ये मिर जाफर ला नवाब पदावर बसविले. मीर कासिम ची ताकद कमी झाल्यानंतर तो अवधचा नवाब शुजाउद्दौला व मुघल बादशहा शहाआलम यांच्याकडे आश्रयाला गेला व बक्सारची लढाई उद्भवली.

टिप्पण्या