बक्सारची लढाई : २२ ऑक्टोबर १७६४
− अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला. मुघल बादशहा शहाआलम दुसरा आणि मीर कासीम या तिघांनी इंग्रजांविरूध्द युती करून बंगालमधून त्यांना हाकलून देण्याचा निश्चय केला.
− बिहार प्रांतातील बक्सार येथे २२ ऑक्टोबर १७६४ रोजी झालेल्या लढाईत मेजर मन्रोच्या अधिपत्याखाली इंग्रजी फौजेने मुघल बादहशाह शहाआलम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला व मीर कासीम यांच्या संयुक्त फौजेचा पराभव केला.
− इंग्रजांचा प्लासीचा विजय मुख्यतः कारस्थान व विश्वासघातावर आधारलेला होता. त्या दृष्टीने बक्सारचा विजय खऱ्या शस्त्रसामर्थ्याचा, होता.
− प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला.
रॉबर्ट क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था : १७६५
− मे १७६५ मध्ये बंगालच्या गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा आलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह ने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था हा महसूल व्यवस्थेचा जुलमी प्रकार सुरु केला
− बंगालची नवाबी बरखास्त करून कंपनी सरकारची सत्ता प्रस्थापित करणे रॉबर्ट क्लाईव्हला काहीच अवघड नव्हते. म्हणून क्लाईव्हने वरकरणी बंगालच्या नवाबाची सत्ता ठेवली.
− दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार कंपनीने बंगाल प्रांतात शांतता राखुन महसूल गोळा करायचा पण कारभार मात्र नवाबाने पहावयाचा.
− बंगालवर सत्ता चालणार ब्रिटिश कंपनींची तर बंगालच्या कारभाराची जबाबदारी मात्र नवाबाची अशी दुहेरी राज्यव्यवस्था क्लाईव्हने निर्माण केली.
− कंपनीने नवाबाला जबाबदार असे दोन नायब दिवाण नेमले. बंगालच्या भागासाठी ‘महंमद रजाखाँ' आणि बिहार भागासाठी 'राजा सिताबराय' हे नायब दिवाण होते.
− रॉबर्ट क्लाईव्हच्या दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे कंपनी सरकारने बंगालमधून प्रचंड संपत्ती जमा केली. बंगालमधून प्रचंड संपत्ती कंपनी सरकारने नेल्याने 'सुवर्णभूमी' असलेला बंगाल भुकेकंगाल झाला. अशा बंगालमध्ये व्यापार, उद्योगधंदे तरी काय चालणार.
− बंगालमध्ये सर्वत्र अव्यवस्था पसरल्याने कंपनीचा व्यापार ही बसला. तेंव्हा ब्रिटिश सरकारने कंपनीच्या कारभाराची व बंगालच्या अव्यवस्थेची चौकशी चालविली व त्यातूनच कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा १७७३ चा रेग्यूलेटिंग अॅक्ट अस्तित्वात आला.
रेग्यूलेटिंग अॅक्ट : १७७३
− रेग्यूलेटिंग अॅक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला.
− बंगालच्या गव्हर्नर जनरलला मुंबई व मद्रास चा गव्हर्नरवर देखरेखीचे अधिकार मिळाले.
− गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ (कौन्सिल) नेमण्यात आले.
− या अॅक्टनुसार भारतात कोलकाता येथे सुप्रिम कोर्टाची (सर्वोच्च न्यायालय) ची स्थापना करण्यात आली.
− गव्हर्नर जनरल, न्यायाधिश व कंपनीचे सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, देणग्या, भेट इत्यादी स्विकारण्यास मनाई करण्यात आली.
इंग्रज-म्हैसूर युध्दे : १७६७ ते १७९९
⋇ पहिले इंग्रज-म्हैसूर युध्द : १७६७ ते १७६९
− दक्षिण भारतातील म्हैसूर राज्यावर हिंदू ‘वोडियार' घराणे अठराव्या शतकात राज्य करीत होते.
− एक साधा शिपाई असलेला हैदरअली स्वकर्तृत्वाने म्हैसूरचा सेनापती झाला.
− हदरअलीने बल्लारपूर, रायदुर्ग, चितळदुर्गच्या राजांना आपले मांडलिकत्व स्विकारावयास भाग पाडले.
− त्यामुळे हैदर अलीच्या नेतृत्वाखाली म्हैसूर राज्य दक्षिणेकडील एक प्रबळ राज्य बनले.
− इंग्रजांनी कर्नाटकवर आक्रमण केल्याने इंग्रज-हैदरअली संघर्ष सुरू झाला.
− इंग्रजांनी जोसेफ स्मिथच्या नेतृत्वाखाली म्हैसूरवर आक्रमण केले.परंतु हैदरने इंग्रजांचा पराभव केला. याचवेळी हैदरने मराठ्यांना ३५ लाख चौथाई देण्याचे मान्य करून मराठ्यांशी शांतता करार केला.
− हैदरअलीने थेट मद्रासपर्यंत गेल्याने भयभीत होऊन इंग्रजांनी ६ एप्रिल १७६९ मध्ये तह केला. तहप्रमाणे परस्परांचे जिंकलेले प्रदेश परत करण्यात आले.
⋇ दुसरे इंग्रज-म्हैसूर युध्द : १७८० ते १७८४
− १७७१ मध्ये मराठ्यांनी हैदरवर आक्रमण केले. त्यावेळी पुर्वी तहात ठरल्याप्रमाणे इंग्रज हैदरच्या मदतीला आले नाहीत.
− त्याच सुमारास इंग्रजांनी 'माहे' (मलबार किनाऱ्यावरील) हे फ्रेंचाचे व्यापारी ठिकाण उद्धवस्त करून टाकले.
− हैदरच्या राज्याला मालाचा पुरवठा ‘माहे' येथून होत असे. तो खंडित झाला म्हणून हैदर इंग्रजावर नाराज होता.
− हैदरअलीने जुलै १७८० मध्ये कर्नल बेली व मेजर मन्रो यांचा पराभव करून अकार्टवर (कर्नाटक) ताबा मिळविला.
− वॉरन हेस्टिंग्जने मुत्सद्दीपणाचा अवलंब करून निजाम व मराठ्यांना हैदरपासून दूर केले.
− एवढेच नव्हे तर मराठ्यांच्या ताब्यातील ओरिसामधून इंग्लिश सैन्य दक्षिणेकडे पाठविण्यास मराठ्यांची अनुमतीही मिळविली.
− पोर्टोनोव्होच्या लढाईत हैदरअलीचा पराभव झाला आणि ७ डिसेंबर १७८२ रोजी कर्करोगाने हैदरअलीचे निधन झाले.
− हैदरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतानने संघर्ष चालूच ठेवला. टिपू सुलतानने इंग्रजावर आक्रमण करून पश्चिम किनाऱ्यावरील मंगलोर व बेदनूर जिंकून घेतले.
− मार्च १७८४ मध्ये इंग्रज व टिपू सुलतान यांच्यात ‘मंगलोर' तह होऊन दुसरे म्हैसूर युध्द समाप्त झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा