गव्हर्नर जनरल व त्यांची कारकीर्द
⋇ वॉरन हेस्टिंग्ज : १७७२ ते १७८५
− १७७२ ला हेस्टिंग्ज ने 'कलेक्टर' पदाची निर्मिती केली.
− १७७२ ला रॉबर्ट क्लाईव्हची ‘दुहेरी राज्यव्यवस्था’ बंद केली.
− १७७३ चा 'रेग्यूलेटिंग अॅक्ट' संमत केला. त्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला.
− हेस्टिंग्जच्या कारकिर्दीत 'चार्ल्स विल्कीन्स' याने 'भगवद्गीतचे' इंग्रजीत भाषांतर केले.
− १७८१ मध्ये कलकत्ता येथे मुस्लीम शिक्षणाचा विकासासाठी 'प्रथम मदरसा' ची स्थापना केली.
− रोहिलखंड प्रकरण, नंदकुमार फाशी प्रकरण, चेतनसिंग प्रकरण, अयोध्येच्या बेगमचे प्रकरण हेस्टिंग्जच्या कार्यकाळातच घडले.
− १७७५ ते १७८२ दरम्यान पहिले इंग्रज-मराठा युध्द झाले व १७ मे १७८२ रोजी सालबाईचा तह झाला.
− १७८४ चा पिट्स इंडिया अॅक्ट संमत केला.
− ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या ‘बोर्ड ऑफ कंट्रोल' आणि 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स' यांची निर्मिती करण्यात आली.
− व्यापारावर देखरेख करण्यासाठी ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स'
− राजकीय कामावर देखरेख करण्यासाठी 'बोर्ड ऑफ कंट्रोल'
− या कायद्यानुसारच कोलकत्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रास चे गव्हर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले.
⋇ लॉर्ड कॉर्नवॉलिस १७८६-१७९३ : कायमधारा पध्दत :
− बंगाल प्रांतात सर्व प्रथम ‘कायमधारा' पध्दतीचा स्विकार १७९३ मध्ये करण्यात आला.
− कॉर्नवॉलिसने सुरूवातीस दहा वर्षाच्या कराराने जमिनदारांना जमिनीचे वाटप केले.
− १७९३ मध्येच कॉर्नवॉलिसने सर जॉन शोअर व जेम्स ग्रँट यांच्या साथीने त्यावर पुन्हा अभ्यास करून जमिनदारांना जमिनीचे कायमचे मालकी हक्क दिले.
− १७९३ मध्ये कॉर्नवॉलिसने मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. जिल्ह्यामध्ये पुलिस स्टेशनची स्थापना केली.
− कॉर्नवॉलिस कोड ही नवी संहित तयार केली. कोड संहिता ही अधिकार व विभाजनाच्या तत्त्वावर आधारलेली होती. त्यानुसार त्याने कर आणि न्याय प्रशासन विभक्त केले.
− कॉर्नवॉलिस हा नागरी सेवेचा (प्रशासन सेवा) जनक मानला जातो.
⋇ लॉर्ड वेलस्ली १७९८-१८०५ व तैनाती फौज: − वेलस्ली हा बंगालचा सिंह म्हणून ओळखला जातो.
− वेलस्लीने १७९८ मध्ये सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा अवलंब केला.
− १७९९ - म्हैसूर
− १८०१ - अयोध्येचा नवाब
− १८०२ - मराठे
− १८०२ ते १८०४ दरम्यान दुसरे इंग्रज - मराठा युध्द झाले.
− ३१ डिसेंबर १८०२ च्या 'वसईच्या' तहानुसार मराठी साम्राज्याचा अस्त झाला.
− कोलकाता येथे नागरी सेवाच्या भर्तीसाठी युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी 'फोर्ट विलियम' कॉलेजची स्थापना केली.
− १८०५ मध्येच वेलस्ली नंतर कॉर्नवॉलिस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला. परंतु कॉलऱ्याच्या साथीने गाझियाबाद येथे त्याचा मृत्यू झाला.
⋇ सर जॉर्ज बार्लो : १८०५-१८०७
⋇ लॉर्ड मिंन्टो पहिला : १८०७-१८१३
− १८१३ चा चार्टर अॅक्ट संमत केला.
⋇ लॉर्ड हेस्टिंग्ज/मार्वेस हेस्टिंग्ज : १८१३-१८२३
− १८१४ ते १८१६ दरम्यान इंग्रज-नेपाळ युध्द झाले व त्यामध्ये नेपाळचा पराभव झाला.
− ५८१६ चा संगोली तहानुसार हे युध्द थांबविण्यात आले. ८१७ ते १८१८ दरम्यान तिसरे व शेवटचे इंग्रज-मराठा युध्द झाले.
− लॉर्ड हेस्टिंग्जच्याच कारकिर्दीत १८२० मध्ये मद्रासचा गव्हर्नर सर थॉमस मन्रो याने आपल्या प्रांतात रयतवारी पध्दत सुरू केली.
− या पद्धतीत जमीन कसणारे शेतकरी जमिनीचे मालक बनले.
− पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला.
− कुळांना संरक्षण देणारा ‘बंगाल कुळकायदा १८२२' मध्ये पास केला.
⋇ लॉर्ड एमहर्स्ट : १८२३-१८२८
⋇ लॉर्ड विल्यम बेंटिक : १८२८-१८३५
− १८२९ चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला.
− प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला.
− लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा १८३५ चा शिक्षणाचा झिरपता सिध्दांत संमत केला.
− निर्दोष व दुर्बल लोकांना लुटणारा डाकूचा व हत्यारांचा समूह ‘ठगांचा' बंदोबस्त केला.
− म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले.
− बालहत्त्या व नरबळीवर बंदी आणली.
− लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकिर्द शांततेची कारकिर्द म्हणून ओळखली जाते.
− १८३५ मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली.
⋇ चॉर्ल्स मेटकॉफ : १८३५
− १८२३ मध्ये भारतीय वृत्तपत्रावर घातलेली निर्बंधने चार्ल्स मेटकॉफने १८३५ मध्ये उठविली म्हणून त्यांना कोलकात्याच्या जनतेने ‘वृत्तपत्राचा मुक्तीदाता' असे म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा