⋇ दुसरे इंग्रज-मराठा युद्ध :
      −  मराठी सत्ताअंतर्गत वाढत जाणारी भांडणे व संघर्ष यामुळे मराठी सत्ता सांभाळणाऱ्या नाना फडणीसांची महत्त्वकांक्षा उधळू लागली. याच तणावात पेशवा सवाई माधवरावने स्वत:ला संपवले. त्यांच्या मृत्युनंतर पेशवेपद दुसरा बाजीराव याकडे आले. मात्र तो पेशवेपदासाठी लायक नसल्यामुळे नाना फडणीसांचे त्याच्याशी जमत नव्हते. त्यातच बारभाईच्या कारभारात नाना फडणीसावर आरोप झाले. या तणावात तो १३ मार्च १८०० रोजी मृत्यू पावला.
      −  याच काळात १७९८ ला विस्तारवादी व आक्रमक धोरणाचा अवलंब करणारा वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला व भारतात इंग्रज सत्ता अकिध प्रबळ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने दक्षिण भारतात इंग्रजाचे वर्चस्व मिळवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावशी मैत्री केली व त्याला तैनाती फौज स्विकारण्यासाठी आग्रह केला मात्र त्यास बाजीरावने नकार दिला. मात्र नाना फडणीसांच्या मृत्यूमुळे मराठी सत्तेचे शहाणपण लयास जात होते.
      − मराठ्यांमधील अंतर्गत बंडाळी इंग्रजांना आपल्या साम्राज्य विस्तारासाठी लाभदायक ठरली.
      −  यशवंतराव होळकर व दौलतराव शिंदे एकमेकांचे वैरी झाले होते. विठोजी होळकर आपल्या साम्राज्यात लुडबुड करत होता, अशी शंका शिंदेंना आल्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिंदेनी पेशव्यांची मदत केली व विठाजीस ठार मारले .(१६ एप्रिल १८०१) वेलस्ली सारखा गव्हर्नर जनरल भारतातील राज्य आपल्या अधिपत्याखाली आणत असताना पेशवे आपल्याच सरदारांना ठार करत असे
      −  विठोजी होळकरास शिंदेनी ठार केल्याचा आघात सहन न झाल्यामुळे सर्व तयारीने त्याने पुण्यात हल्ला केला व त्याला वसईला जाण्यास भाग पाडले. परिणामी बाजीराव तह (३१ डिसे. १८०२) झाला या तहानुसार,
१) पेशव्यांनी इंग्रजाशिवाय इतर युरोपियांना सेवामुक्त करा.
२) सुरत शहर कंपनीला देण्यात यावे
३) दोन्ही पक्षांनी आपापला प्रदेश सांभाळावा.
४) बाजीरावने निजामकडून चौथाईचा अधिकार सोडून द्यावा.
५) बाजीरावने इंग्रज संरक्षण पत्करून इंग्रजांची ६००० तैनाती फौज तोफ खान्यासह पुण्याला ठेवण्याचे मान्य केले.
६) पेशव्याचा परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित केले.
      −  वसईचा तह मराठ्यांची सत्ता संपुष्टात येण्याचा महत्त्वाचा घटक होता असे मानले जाते. तसेच वेलस्लीने आपल्या कायदेशीर अधिकारांना धरून दुर्बल पेशव्यांना हाताखाली धरून मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
      −  पेशवा कमकुवत झाल्यामुळे इंग्रजांना चांगलाच राजकीय फायदा झाला. इंग्रजांनी त्यांना तैनाती फौज स्विकारण्यास भाग पाडले. त्याचबरोबर वसईच्या तहामुळे इंग्रजांचे पूर्णपणे भारतावर वर्चस्व निर्माण झाले नसले तरी त्याकडे त्यांची यशस्वी वाटचाल चालू होती. ह्या तहामुळे कंपनीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रुपाने भारताला आपल्या आमलाखाली आणता आले. वसईच्या तहामुळे मराठे अपमानीत होते. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचे बाजीरावचे कृत्य कोणालाच आवडले नाही. इंग्रज मराठ्यांवर करत असलेली सत्ता मोडून काढली पाहिजे असा बऱ्याच जणांचा आग्रह होता, पण त्यातही एकीअभावी ते अयशस्वी ठरले.
      −  मराठ्यांची आपपसातील दुफळी पाहून दक्षिण भारतात ऑर्थर वेलस्ली इंग्रजांचे नेतृत्व करण्यासाठी आला व त्याने शिंदेवर मात केली. तर उत्तर भारतात जनरल लेकने भोसल्याचा पराभव केला व १७ डिसेंबर १८०३ ला इंग्रज व भोसले यांच्यात देवगावचा तह झाला. या तहान्वये,
१) भोसल्यांची कटक प्रांत इंग्रजांकडे सुपुर्द केला.
      −  त्याचप्रमाणे शिंदेनी पराभवानंतर इंग्रजांसोबत सुर्जी-अंजनगावचा तह केला यानुसार शिंदे व भोसले यांनी वसईचा तह मान्य केला व ब्रिटिश रेसीडेन्सी ठेवण्याचे कबूल केले.
      −  या युद्धानंतर यशवंतराव होळकर इंग्रजाविरुद्ध संघर्ष करु लागले. सुरुवातीला त्यांना यश मिळाले परंतु बलाढ्य ब्रिटिशासमोर यशवंतराव दुबळा पडला व इंग्रजासमोर हतबल होऊन त्याने रांजपूर घाटचा तह केला (२५ डिसे, १८०५) या तहानुसार,
१) चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश इंग्रजांना दिला.
२) बुंदेल खंडावरील नियंत्रणाचा त्याग केला.
      −  अशाप्रकारे सर्वच मराठा सरदार ब्रिटिश अमलाखाली आली व मराठी सत्तेला उतरती कळा आली व दुसरे युद्ध संपले.
⋇  तिसरे इंग्रज-मराठा युद्ध :- (१८१७ - १८१८)
      −  द्वितीय इंग्रज-मराठा युद्ध व राजघाटचा तह झाल्यानंतर दोन्ही सत्तांना जो वेळ मिळाला त्याचा उपयोग दुसऱ्या बाजीरावने शिंदे, भोसले व होळकरांना एकत्र आणुन इंग्रजाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी केला, परंतु ग्रजाविरुद्ध दुसऱ्या बाजीरावचा टिकाव झाला नाही, तसेच मराठा साम्राज्यात शरकाव करणाऱ्या पेंढारी व पठाणांशी वाटाघाटी केल्या.
      −  दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर १०-१२ वर्षाच्या काळातही मराठे आपापसात संघर्ष करुन मराठी सत्ता अधिकच धोक्यात टाकत होते. याच दरम्यान १८१३ ला आक्रमक धोरणाचा अवलंब करणारा लॉर्ड हेस्टिंग्जची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्याने अप्रत्यक्षपणे मराठ्याविरुद्ध संघर्ष चालू केला.
      −  १३ जून १८१७ ला इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात पुणे तह झाला, या तहानुसार,
१) बाजीरावने मराठ्यांचे पेशवेपद सोडावे.
२) परराज्याशी इंग्रज परवानगीशिवाय संबंध ठेवू नये.
३) तैनाती फौजेंची संख्या वाढवावी.
४) सिहंगड, पुरंदर, रायगड हे किल्ले इंग्रजांना द्यावेत.
      −  हा तह बाजीरावला खूप जाचक वाटत होते. त्यासाठी त्याने शिंदे, होळकर व भोसले यांच्याशी गुप्त बातचीत केली, पण ही बातमी इंग्रजांना कळाली. बाजीरावने इंग्रज रेसीडेंटचा मुद्दाम अपमान केला. ५ नोव्हे १८१७ रोजी मराठा-इंग्रज युद्ध खडकीला सुरु झाले. त्यात इंग्रजांनी मराठ्यावर मात केली. बाजीराव पुरंदरला पळून गेल्याचे वृत्त समजताच इंग्रजांनी थेट पूणे येथे १७ नोव्हे, १८१७ रोजी शनिवारवाड्यावर आपला युनिअन जॅक फडकवला.
      −  बाजीराव इंग्रजांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पंढरपुरला जावून सेनापती गोखले, सातारचे प्रतापसिंह भोसले यांना जाऊन मिळाला. पण इंग्रज त्याच्या मागावरच होते. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव व १९ फेब्रुवारी १८१८ रोजी आष्टा येथे झालेल्या युद्धात बाजीराव पराभुत झाला. प्रतापसिंह भोसले इंग्रजांच्या स्वाधीन झाले. उत्तरेत इंग्रजांनी होळकर व भोसल्यांचा पराभव केला, त्यामुळे हतबल झालेल्या बाजीरावने ४ जून १८१८ रोजी जॉन माल्कमच्या स्वाधीन केले.
      −  इंग्रजांनी बाजीरावचे राज्य खालसा करून ८ लक्ष रु. पेन्शन दिले व कानपूर जवळ बिठुर येथे ठेवले. बाजीरावचा सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.
      −  अशा प्रकारे मराठा सत्तेचा शेवट झाला. मंगलांच्या अवशेषांवर पाय ठेवून मराठा जरी दक्षिण भारतात प्रबळ ठरले असले तरी आधुनिक शस्त्रास्त्रे, लष्करी व्यवस्था, कुटनिती इ. व्यवस्था असलेल्या बलाढ्य इंग्रजासमोर टिकू शकले नाही. बुद्धीमान व शुरविर मराठे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेल्या ऐक्यभावनेच्या अभावी स्वतःचा आत्मघात करून घेतले.

टिप्पण्या