−  सुभाषचंद्र बोस यांना गांधीजींचे विचार नपटल्याने ‘स्वराज्य पक्षात' प्रवेश केला.
−  स्वराज्य पक्षातर्फे कोलकाता महापालिका निवडणुकीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
−  १९२४ मध्ये बंगाली क्रांतिकारकांना मदत केल्याने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून मंडालेच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तुरूंगात असतांनाच जनतेने त्यांना कायदेमंडळावर निवडून दिले.
−  सुभाषचंद्र बोस हे १९३८ च्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
−  गांधीजीचे सहकारी पट्टाभाई सितारमय्या यांचा पराभव करून १९३९ च्या त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.
−  राष्ट्रसभेतील श्रेष्ठींशी न पटल्याने सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ मध्ये 'फॉरवर्ड ब्लॉकची' स्थापना केली.
−  १७ जानेवारी १९४१ रोजी सुभाषचंद्र बोस गुप्तपणे 'झियाउद्दीन' हे नाव धारण करून अफगाणिस्तान − रशिया मार्गे जर्मनीतील बर्लिन येथे पोहोचले.
−  जर्मनीतील हिंदी सैनिकांना हाताशी धरून सुभाषचंद्र बोस यांनी 'फ्री इंडिया आर्मी' व 'लिबरेशन आर्मी' या फौजा तयार केल्या.
−  सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन येथे ‘आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले.
−  मार्च १९४२ मध्ये डॉ. रासबिहारी घोष यांनी टोकियो येथे ‘आझाद हिंद सेना' स्थापन केली.
−  कॅप्टन मोहनसिंग हे आझाद हिंद सेनेचे सुरूवातीचे सेनापती होते.
−  रासबिहारी घोष यांनी सिंगापूर, मलेशिया, म्यानमार या प्रदेशातील भारतीय लोकांची एक संघटना बांधून हिंद स्वतंत्र संघ स्थापन केले.
−  ब्रीद वाक्य = विश्वास − एकता − बलिदान
−  युद्ध घोषणा = चलो दिल्ली
−  निशाण = चरख्याचे चित्र असलेला तिरंगी झेंडा
−  बोधचिन्ह = झेप घेणारा वाघ
−  मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र = जय हिंद
−  समरगीत = कदम कदम बढाए जाये
−  १३ जून १९४३ रोजी रासबिहारी घोष यांच्या निमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले.
−  ५ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे अध्यक्षपद व सरसेनापती पद स्विकारले.
−  २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथील कॅथे − हॉलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे ‘हंगामी सरकार' स्थापन केले.
−  आझाद हिंद सरकारच्या पराक्रमाने भारावून जाऊन जनतेने सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही पदवी दिली.
−  आझाद हिंद सेनेत राणी झाँशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व 'कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन' (सेहगल) यांच्याकडे होते.
−  या महिलांच्या तुकडीमध्ये जानकी थीवी, बेला दत्त या महिलांचा समावेश होता.
−  १८५१ च्या युद्धात लोकप्रिय झालेला 'चलो दिल्ली' हा संदेश नेताजींनी आझाद हिंद सेनेस देऊन भारतीयांना 'तुम मुझे खून दो, मै तुम्हें आझादी दूंगा' असे आव्हान केले.
−  नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने 'अंदमान व निकोबार' ही भारतीय बेटे जिंकून आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केली.
−  नेताजीनी या बेटाचे नामकरण 'शहीद' व 'स्वराज्य' असे केले.
−  मे १९४४ ला आझाद हिंद सेनेच्या सुभाष ब्रिगेडने आसाम मधील 'मॉवडॉक' हे ठाणे जिंकून भारतीय भूमीवरील पहिला विजय नोंदविला.
−  ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या अनुक्रमे 'हिरोशिमा' व 'नागासाकी' या शहरावर अनुबॉम्ब टाकल्याने जपानचा पराभव झाला.
−  जपानचा पराभव झाल्याने आझाद हिंद सेनेचा प्रभाव कमी झाला.
−  आझाद हिंद सेनेच्या मे.ज. शहानवाझखान मेजर जगन्नाथराव भोसले, कर्नल धिल्लन, कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन इत्यादि अधिकाऱ्यावर नोव्हे. १९४५ मध्ये राजद्रोहाचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला.
−  आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावरील खटला दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्यात चालला.
−  आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांचे वकिल म्हणून भुलाभाई देसाई, पं. जवाहरलाल नेहरू, तेजबहादूर सप्रू, इ. लोकांनी काम केले.
−  १८ ऑगस्ट १९४५ रोजी टोकियोकडे जातांना फार्मोसा बेटातील तायपै येथे विमान अपघातात नेताजींचे निधन झाले.
⋇ अनुशिलन समिती :
−  स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणानी बंगालमध्ये अनुशीलन समिती नावाची गुप्त संस्था स्थापन केली.
−  बारिंद्रकुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांच्या पुढाकाराने अनुशिलन समितीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली.
−  हेमचंद्र दास, उल्हासकर दत्त, खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी हे क्रांतिकारक अनुशिलन समितीचे सदस्य होते.
−  हेमचंद्र दास याने रशियात जाऊन बाँम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. हेमचंद्र दास व उल्हासकर दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याजवळ बाँब तयार करण्याचे कार्य सुरु केले.
−  या बॉम्बचा पहिला प्रयोग पूर्व बंगाल प्रांताचा जोन बाम्फिल्ड फल्पर' यांच्यावर केला. ३० एप्रिल १९०८ रोजी कोलकत्त्याच्या मॅजिस्ट्रेट किंग्ज फोर्ड याला ठार मारण्याचा प्रयत्न खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी केला.
−  क्रांतिकारकांच्या गुप्त केंद्रावर धाड टाकून बाँब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले
−  या सर्व क्रांतिकावर ‘अलिपूर' च्या न्यायालयात खटला चालविण्यात आला.
−  या खटल्यातील सरकारी वकिल ‘आशुतोष विश्वास' व पोलिस अधिकारी 'शम्स − उल − अलम' या दोघांचीही न्यायालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली.
−  या बॉम्ब हल्ल्यामध्ये किंग्ज फोर्ड बचावले. परंतु २ इंग्रज स्त्रिया मारल्या गेल्यामुळे प्रफुल्लकुमार चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडली तर खुदीराम बोस यांना पकडून फाशी देण्यात आली.
−  बारिंद्रकुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त या नेत्यांनी युगांतर समितीची स्थापना करून १९०६ मध्ये 'युगांतर' हे क्रांतिचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरू केले.
−  क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी 'वंदे मातरम्' तर बिपिनचंद्र पाल यांनी 'न्यू इंडिया' ही वर्तमानपत्रे सुरू केली.
−  बिपिनचंद्र पाल यांनी बंगालमध्ये ‘काली पुजा' सुरू केली. बंगालमध्ये अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल यांनी जहालमतवादाचा प्रचार केला.
−  राष्ट्रकार्य म्हणजे धर्मकार्य ईशकार्य असे म्हणून अरविंद घोष यांनी आपल्या विचारांना आध्यात्मिक बैठक दिली.

टिप्पण्या